संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २०२३
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान. वारी ही महाराष्ट्रातील अद्भुत परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरु असतो. विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठलभक्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात. अहंभाव त्यागून वारीतील प्रत्येक जण केवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारी करतात.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम दिला आहे.